सह्याद्री हा एक अनादी, अनंत आणि अवीट असा मोह आहे! एकदा का त्याची गोडी लागली की, ती कायम घोळतच राहते…
प्रसादने ही मोहीम फक्त पूर्ण केली नाही, तर सह्याद्रीच्या अंगा-खांद्यावरील भ्रमंतीचा, तिथल्या पर्यावरणाचा, ग्रामीण जीवनाचा, ग्रामस्थांचा, त्यांच्या संस्कृतीचा पुरेपूर अनुभव घेत, त्यातून आनंद घेत पूर्ण केली होती. त्यामुळे प्रसादने ही मोहीम सफल संपूर्ण केली, त्या दिवशी या खडतर, धाडसी मोहिमेच्या त्याच्या शरीर व मनावर झालेल्या परिणामांच्या खुणा दिसल्या नाहीत.......